शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

साखर विक्रीचा हमीभाव ३४ रुपये निश्चित करा; जयंत पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:17 IST

इस्लामपूर : साखर कारखानदारीला मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाला घ्यावी लागेल. त्यामुळे साखर विक्रीचा हमीभाव प्रतिकिलो २९ ...

इस्लामपूर : साखर कारखानदारीला मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाला घ्यावी लागेल. त्यामुळे साखर विक्रीचा हमीभाव प्रतिकिलो २९ रुपयांऐवजी ३४ रुपये निश्चित करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याच्या साखराळे युनिटच्या २०१८-१९ च्या ४९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आ. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, अतिरिक्त साखर हे या उद्योगासमोरील मोठे संकट आहे. गेल्यावर्षीची १०० लाख क्विंटल साखर शिल्लक असून, यावर्षी साधारण ३०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. आपल्या देशाची २४२ लाख क्विंटल साखरेची गरज आहे. म्हणजे हा हंगाम संपताना १५८ लाख क्विंटल अतिरिक्त साखर देशात असणार आहे. मध्यंतरी शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिवांना बोलावून साखर उद्योगासमोरील अडचणी सांगितल्या आहेत. सरकारने साखर विक्रीची किंमत ३५०० रुपये केली, तर बरेच प्रश्न सुटणार आहेत. राज्य सरकारने साखर निर्यातीस केंद्र सरकारप्रमाणे वाहतुकीस अनुदान जाहीर करावे. मध्यंतरी मी व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या लवादाने तोडणी मजुरांना सध्याच्या दरावर ५ टक्के वाढ केलेली आहे. आपल्या ‘लक्ष्य १०० टनाचे’ या प्रकल्पास मोठे यश मिळाले आहे.ते म्हणाले, परिपक्व ऊस उत्पादनासाठी शेती विभागामार्फत मार्गदर्शन होणार आहे. लहान शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढविण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल. यापुढील काळात ऊस नोंदणी, तोडणी अशी सर्व कामे मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शीपणे केली जाणार आहेत.